प्रेम प्रेम अन् प्रेमच..!!!!!
गाईचे वासरावरती असते ते प्रेम………
चिमणीचे पिल्लांवरती असते ते प्रेम………
आईचे मुलांवर असते ते प्रेम………
नवरा- बायकोचे एकमेकांवर असते ते प्रेम………
अन् प्रियकराचे प्रेयसीवर व प्रेयसीचे प्रियकरावर असते ते सुद्धा प्रेमच……..
प्रेमाचे प्रकार तसे अनेकच,
पण त्याच्या मागील भावना मात्र एकच…..
आजच्या जीवनात खरे प्रेम तसे क्वचितच मिळते…
खरे प्रेम असावे तरी कसे!!!!!
तर….
खरे प्रेम असावे…..
कमळासारखे, जे पाण्याची साथ कधीच सोडत नाही,
त्याच्याशिवाय ते कधीच उगवत नाही….
खरे प्रेम असावे…..
गुलाबासारखे, जे कोमल आणि सुगंधी जरी असले,
तरी काटयाची साथ कधीच सोडत नाही….
खरे प्रेम असावे…..
आकाशासारखे विशाल व विस्तीर्ण..
कुठेही गेले तरी न संपणारे,
सदैव आपल्या बरोबर असणारे…..
खरे प्रेम असावे…..
पैशाने विकत न घेता येण्यासारखे,
वेळ आलीच तर पैशालाही झुकवण्यासारखे……
कारण…..
प्रेम हा काही खेळ नाही,
टाइम-पास करण्याचा तो वेळ नाही……..
by मी रेश्मा | 0 comments
कथा एका सागराची !!
Jul 16, 2009
एकदा काय झालं,एक सरिता रागवली
आपल्या boyfriend ला म्हणाली'
हे रे काय सागर !मीच का म्हणून ?
दर वेळी मीच कामीच का यायचं खाली डोंगरावरून ?
आणायचं रानावनातलं सारं तुझ्यासाठी
दरी बघायची नाहीकडा बघायचा नाही
कशी सुसाट पळत येते मी विरहव्याकुळ, संगमोत्सुक
कधी एकदा तुला गच्च मिठी मारीन
तुझ्यात हरवून , हरपून जाईन
आणि तू वेडा तुझं लक्षच नसतं
कधी सारखा त्या चंद्रिकेकडे टक लावून असतोस.
उसळतोस तिच्यासाठी तुझ्यासाठी पाणी आणते मी
पण तुला भरती येते तिच्यासाठी मी नाही जा !
बोलणारच नाही आता येणारही नाही.
काठावरच्या लोकांना सांगून मोट्ठं धरण बांधीन
थांबून राहीन तिथेच.बघच मग.
सरिताच ती बोलल्याप्रमाणे वागली.
सागर बिचारा तडफ़डला आकसला,
आतल्या आत झुरत गेला.
शेवटी फ़ुट्ला बांध त्याच्याही संयमाचा
उठला ताड ओरडला
दहाड उफ़ाळला वारा पिऊन,
लाटांचं तांड्व घेऊन सुटला सुसाट
सरितेच्या दिशेने
लोक येडे.म्हणाले
'सुनामी आली ! सुनामी
कवी : अद्न्यात
by मी रेश्मा | 2 comments
" गारवा "
Jul 13, 2009
त्याला पाऊस आवडत नाही,तिला पाऊस आवडतो.
ढग दाटून आल्यावर तो तिच्या तावडीत सापडतो.
मी तुला आवडते पण पाऊस आवडत नाही,
असलं तुझ गणित खरच मला कळत नाही.
पाऊस म्हणजे चिखल सारा पाऊस म्हणजे मरगळ,
पाऊस म्हणजे गार वारा पाउस म्हणजे हिरवळ.
पाऊस कपडे खराब करतो पाऊस वैतागवाडी
पाऊस म्हणजे गार वारा पाऊस म्हणजे झाडी.
पाऊस रेंगाळलेली कामे पाऊस म्हणजे सूटी उगाच,
पावसामध्ये गुपचुप निसटुन मन जाऊन बसतं ढगात.
दरवर्षी पाऊस येतो दरवर्षी अस होतं
दरवर्षी पाऊस येतो दरवर्षी अस होतं.
पावसावरून भांडण होऊन लोकांमध्ये हसं होतं
पाऊस आवडत नसला तरी ती त्याला आवडते
पाऊस आवडत नसला तरी ती त्याला आवडते.
पावसासकट आवडावी ती म्हणूण ती ही झगडते.
रूसून मग ती निघून जाते भिजत राहते पावसात.
रूसून मग ती निघून जाते भिजत राहते पावसात.
त्याचं तिचं भांडण असं ओल्याचिंब दिवसात. !!!!!!!!!!!
कवी : सौमित्र (अल्बम: गारवा)
by मी रेश्मा | 3 comments
पाणी आणि मन
Jun 15, 2009
पाण्यात आणि मनात साम्य ते काय?
दोन्ही जर गढूळ असतील तर दोघही आयुष्य संपवू शकतात.
पाण्यात आणि मनात साम्य ते काय?
दोन्ही जर उथळ असतील तर धोक्याच्या पातळी कडेच ओढवतात.
पाण्यात आणि मनात साम्य ते काय?
दोन्ही स्वछ असतील तर जातील तिथे आनंदवनच फुलवतात.
पाण्यात आणि मनात साम्य ते काय?
ग्रीष्म परिस्थितीत दोघेही कोरडेच पडतात
पण पाण्यात आणि मनात मुख्य फरक तो काय?
एकावर बांध घातला तर ते संथ होते, आणि तोच दुसर्याला घातला तर ते संत होते.
कवी - अद्न्यात
by मी रेश्मा | 1 comments
Nov 13, 2008
तुझ्याच आठवांमधुनी सखे
काही श्वास तरंगून गेले
घडा रिताच राहीला आयुष्याचा
अन प्राण कलंडून गेले
हात तुझे ते हातांमधले
एकांती स्मरुनीया गेले
रंग हळवे ते शपथांचे
भासात विरुनीया गेले
आधार वाटणारे तुझे ते डोळे
काल स्वप्नात दिसुनीया गेले
दडपलेले दुःख मनातील
शब्दात उतरुनिया गेले
कवी : अद्न्यात
by मी रेश्मा | 4 comments
अवघड आहे एखादा निर्णय घेणं......
जिवनाचे गणित सहजपणे सोडवणं......
कशाची आठवण ठेवायचीये
कुठली गोष्ट विसरायचीये
कोणाला मनातलं सांगायचाय
कोणापासुन सगळ लपवायचय
अवघड आहे एखादा निर्णय घेणं......
जिवनाचे गणित सहजपणे सोडवणं......
कधी आवाज द्यायचा
कधी निशब्द व्हायचय
कधी रडता रडता हसणं
तर कधी हसता हसता रडणं
अवघड आहे एखादा निर्णय घेणं......
जिवनाचे गणित सहजपणे सोडवणं......
कुठे मार्ग बदलायचाय
कुठुन आल्यापावली परतायचय
अवघड आहे एखादा निर्णय घेणं......
जिवनाचे गणित सहजपणे सोडवणं......
कवी : अद्न्यात
by मी रेश्मा | 0 comments
जीवनाच्या वाटेवर अनेक प्रवासी भेटतात,
काही हात धरतात तर काही धरलेला हात सोडतात
काहींच्या क्षणभर सहवासाने आपली वाट बहरुन येते
आठवणींच गाठोड मात्र आयुष्यभरासाठी मागे ठेउन जाते
मग त्या गाठोडयात आपण आनंदाचे क्षण शोधत राहतो
तो शोधताना हातातील वर्तमान वाळुसारखा निसटुन जातो
एवढ काय असत त्या गाठोडयात? मला कळल नाही
पण त्याला बाजुला सारुन प्रवास करण मलाही जमणार नाही
त्याला ह्रदयाशी धरुन मी माझा प्रवास पुरा करणार
माझ्या बहरुन आलेल्या वाटेला मी आयुष्यभर जपणार
कवी : अद्न्यात
by मी रेश्मा | 0 comments
ऑनलाइन
तुझं सांभाळुन बोलणं
मर्याद्शील वागणं
किति राग आला तरि
मुळिच नाहि तोडणं
तुझि प्रत्येक गोष्ट
मला भुलवत गेलि
अशि तुझि माझि
मैत्रि खास झालि
मग सुरु झाले
वाट बघायचे तास
ऑनलाइन नाहिस म्ह् णुन
डोक्याला त्रास
मग तुझा मेसेज
जरा बिझि आहे मि
पण विसरु नकोस
"यु आर स्पे शल फॉर मि"
आपले वेगळे देश
वेगळ्या आहेत वेळा
"बट आय लाइक यु"
सांगु किति वेळा?
दोन मैत्रिचि कार्डं
त्यात लिहिणं "डिअर"
रडका स्मायलि टाकला
कि म्हणे "आय केअर"
सोडुनच दिलय मिहि
मेसेंजर वर जाणं
पण मिस्ड कॉल येतो का
मोबाइल वर पहाणं
by मी रेश्मा
Aug 14, 2008
"काय आवडत तुला माझ्यातल..........??
"तु सारख मला विचारतेस.....मि काहिच बोलत नाहि
म्हणुन मनातल्या मनात हिरमुसतेस
......तुला रुसलेल बघुन मग मी अजूनच तुला चिडवतो
आणि तुझ्या चहेय्राकडे बघुन फ़क्त भुवया उडवतो
..........."तशी ठिक आहेस ग
..........पण सांगण्यासारखं नाहिय काहि
नकट नाक, चिमुकले डोळे आणि रंगाचा तर पत्ताच नाहि.........."
"तरि आवड्तेस तु मला काळजी करू नकोस,
आधिच छोट्या ओठांना आणखिन दाबू नकोस......
"मनभर अस चिड्वूनमी तुझ्याकडे बघितल,
पाठ्मोय्रा तुला हात धरून माझ्याकडे वळवलं........
नजरेला नजर भिडली फ़क्त आणि हसू माझे ओसरले,
भावविभोर तुझ्या डोळ्यांतून झरझर अश्रु ओघळले..........
वेडि आहेस का? म्हणतं मी जवळ तुला घेतल,
तुझे डोळे पुसता पुसता स्वत:लाहि आवरलं............
बोलायच बरच होत पण शब्द्च फ़ूट्त नव्ह्ते
मला बिलगलेली तू माझे काळिज भिजत होते....
पण आज खर सांगू......तू सर्वाथाने जिंकलयस मला लाडके.........
तुझं हळवं मनतुझा गुलाम करतं मला..................लाडके
......... तुझं हळवं मनतुझा गुलाम करतं मला..................
कवी : अद्न्यात
by मी रेश्मा | 1 comments
काळे - गोरे..........
Aug 13, 2008
जेंव्हा आम्ही नुकते जन्मतो
..........................तेव्हा काळे असतो
आणि जेंव्हा वयात येतो
..........................तेव्हा काळे असतो
जेंव्हा आम्ही उन्हात जातो
..........................तेव्हा काळे असतो
आणि जेव्हा थंडीत जातो
..........................तेव्हा काळे असतो
जेंव्हा आम्ही हिंस्त्र बनतो
.......................... तेव्हा काळे असतो
कधी आम्ही खूप घाबरतो
.......................... तेव्हा काळे असतो
जेव्हा आम्ही आजारी पडतो
.......................... तेव्हा काळे असतो
सरते शेवटी,जेव्हा केव्हा मरण पावतो
.......................तेव्हाही काळेच असतो
आणि तुम्ही गोरे लोक,
जेंव्हा नुकतेच जन्मता,
................तेव्हा गोड गुलाबी असता
जेंव्हा केंव्हा वयात येता,
.................तेव्हा सफ़ेद गोरे दिसता
जेंव्हा उन्हात जाता,
...............तेव्हा लालभडक दिसता
आणि थंडीत जाता,
.................तेव्हा निळसर भासता
जेंव्हा हिंस्त्र बनता,
………….......तेंव्हा जांभळे दिसता
कधी खुप घाबरता
..............तेव्हा पिवळसर दिसता
जेंव्हा आजारी पडता,
................तेव्हा हिरवेगार दिसता
कण्हता आणि मरण पावता,
....................तेव्हा राखाडी बनता
असे रंगीबेरंगी लोक, तुम्ही !
आम्हाला.. आम्हाला….या काळ्यांना 'कलर्ड' म्हणता?
कवी : अद्न्यात
by मी रेश्मा | 1 comments
ओळख शब्दाची.....
Jun 8, 2008
शब्दाची ती ओळख माझी
यावेळी ही पहिलीच आहे
दुनियच्या त्या सुखाशी
भेट माझी पहिलीच आहे .......... .............
लेखणितले सामर्थ्य
आज मी सांधणार आहे
शक्या तितक्या शब्दात
आज मी झुन्जनार आहे ....
खोट्या शपता खोटे मार्ग
आजमवणार आहे
हलक्याश्या श्वासने
सत्य ची बाजू नव्याने मांडणार आहे ....
सुख तेवढे दुख श्रेष्ठ
उगाच उगळुन ही कोळसा आहे
साथ न मिळता शब्दाची
सूर देखील दुबला आहे .............
रेश्मा......................
by मी रेश्मा | 4 comments
माझ्या चारोळ्या..........
Jun 6, 2008
उमगे जिवा या न अर्थ कसला
बेभान जाहले कसे सावरू स्वताहाला
तीळ तीळ तुटते मन तुझ्याचसाठी
परी अर्थ ना उमगे तुझ्या खुळ्या मनाला
*************************
सवय झाली मला
तुझ्या शांत असण्याची
आसवे मनात दडवून
शक्य तितक हसण्याची.........
*************************
पानवलेल्या डोळ्यात आज
आश्रू नाही वाट न मिळली
स्पर्शलेल्या त्या सुखाची
कन भर ही साथ न उरली......
************************
क्षणात येती पाखरे
मनी घरटे बांधुनी जाती
उरलेल्या आठवांचे स्वप्न
मात्र उरी ठेऊनी जाती..!!!!!
**************************
श्रावणाच्या जल धारा
कधी मजवरि बरसून गेल्या
मनातले गुपित माझे
हळूच ओठावर ठेऊन गेल्या
**************************
शब्द असे सांडतील मोती
ओंजळ माझी तरी रिती
साथ अशी शब्दांची
का वाटे मज चोरटी..........
**************************
अबोल्याताले जगाने
माझे थोडेसे राहून गेले
थोडेसे शब्द आणि बरसे मौन
यात आयुष्य वाहून गेले ...!!!
****************************
सरले वर्ष आता पुन्हा नवी पहाट
नवीन किराणाचा लेऊन साज ...
नको बंध नकोत नको आश्रू...
नव स्वप्ना ना देऊ नवी वाट.
*****************************
आठावाचा एक आसु
हळूच गालावरून ओघाळला
मुकया भावनेने माझ्या
पापण्यात होता जो अडवलेला
रेश्मा..........
by मी रेश्मा | 5 comments
निरागस काळी
त्या चिमूरडिला पाहता
मन माझे आज हिरमुसले
जगण्याच्या जिद्दा पायी
तिचे बालपणच मालवले
छोट्याश्या त्या सावलिचे
मार्ग का खडतर होता
देवालाहि दया न यावी
असा काय तिचा गुन्हा होता
फुलासारख्या त्या जीवाची
पकली न पकली खुडलेली
आणि कोमालाष्या त्या हातात
फुलाचीच पाटी बहरलेली ..
गाजर्याच्या सुगंधातही
जीव तिचा सुखावलेला
कडाक्याच्या उन्हाताही
मोगर्या सारखा खुललेला
क्षणाची प्रतिमा तिची
मन माझे हिरावून गेली
निरागस हास्य तिचे
असंख्य प्रश्न विनून गेली
नुकत्याच खुललेली ती कळी
फुलन्या आधी विखुरली
सावराया त्या कळी ला
माझी ओंजळ ही कमी पडली ...................
रेश्मा......................
by मी रेश्मा | 2 comments
माझे मन....
मनी हसले गाव माझे अन् ,
क्षणात फुलले मन माझे..........
शब्दाविन सजले अन्
वार्यातही झुलले मन माझे..........
क्षण अनेक येती अन्
अनेक येती पावसाले
सुरविण रमले अन्
तालावर धुंधले मन माझे................
चांदण्याच्या अवकाशी
शीतल जल काठी
तुझ्याच सवे निशब्द
रमले मन माझे..........................
आश्रू तही हसले
वादळतही स्थब्दले
तुझ्या आठवणींच्या
सरित भिजले मन माझे.......................
तुझ्या विरहातही
सुरत गायले पण
तुझ्या विन एकटेच
भासले मन माझे.................
रेश्मा......................
by मी रेश्मा | 3 comments
