!! " श्री गणेशाय नमः "!!

काल चक्र ..!!!  

Jul 22, 2009

पूर नदीला चढतो
तेव्हा मासे फ़िरती नव्या जगातून.
परवश होती किडे मुंगळे
ताव मारती मासे त्यांवर ॥....
---------------------------------
---------------------------------
परंतू जेव्हा पाणी आटे
जमीनीवर तडफ़डती मासे
किडे मुंगळयां मेजवानी रे
काल चक्र हे असेच भासे ॥
*************************
नाती फ़ुलतात पण फ़ुलं नव्हेत
नाती टोचतात पण काटे नव्हेत
कधीतरी भिजवतात नाती कोरडी
जी भिजवत नाहीत कधी ती नातीच नव्हेत.
***************************************
दोन अश्रू निरोपाचे
दोन शब्द समारोपाचे
आंब्या सारखे दरवळती
दोन क्षण सांज भेटीचे !!!
*******************************************
विठ्ठल विटला विटेला
जनांत वोळता जाहला
वारक-यांच्या सोबतीने
गांवोगांव पसरला
*******************************************
वहीतला गुलाब
कध्धी कध्धी फ़ुलत नाही
वळणावरची रजनीगंधा
आजकाल दरवळत नाही.
*******************************************
-सुनिल सामंत

AddThis Social Bookmark Button


प्रेम प्रेम अन् प्रेमच..!!!!!  


गाईचे वासरावरती असते ते प्रेम………
चिमणीचे पिल्लांवरती असते ते प्रेम………
आईचे मुलांवर असते ते प्रेम………
नवरा- बायकोचे एकमेकांवर असते ते प्रेम………
अन् प्रियकराचे प्रेयसीवर व प्रेयसीचे प्रियकरावर असते ते सुद्धा प्रेमच……..
प्रेमाचे प्रकार तसे अनेकच,
पण त्याच्या मागील भावना मात्र एकच…..
आजच्या जीवनात खरे प्रेम तसे क्वचितच मिळते…
खरे प्रेम असावे तरी कसे!!!!!
तर….
खरे प्रेम असावे…..
कमळासारखे, जे पाण्याची साथ कधीच सोडत नाही,
त्याच्याशिवाय ते कधीच उगवत नाही….
खरे प्रेम असावे…..
गुलाबासारखे, जे कोमल आणि सुगंधी जरी असले,
तरी काटयाची साथ कधीच सोडत नाही….
खरे प्रेम असावे…..
आकाशासारखे विशाल व विस्तीर्ण..
कुठेही गेले तरी न संपणारे,
सदैव आपल्या बरोबर असणारे…..
खरे प्रेम असावे…..
पैशाने विकत न घेता येण्यासारखे,
वेळ आलीच तर पैशालाही झुकवण्यासारखे……
कारण…..
प्रेम हा काही खेळ नाही,
टाइम-पास करण्याचा तो वेळ नाही……..

कवी : अद्न्यात

AddThis Social Bookmark Button


कथा एका सागराची !!  

Jul 16, 2009

एकदा काय झालं,एक सरिता रागवली

आपल्या boyfriend ला म्हणाली'

हे रे काय सागर !मीच का म्हणून ?

दर वेळी मीच कामीच का यायचं खाली डोंगरावरून ?

आणायचं रानावनातलं सारं तुझ्यासाठी

दरी बघायची नाहीकडा बघायचा नाही

कशी सुसाट पळत येते मी विरहव्याकुळ, संगमोत्सुक

कधी एकदा तुला गच्च मिठी मारीन

तुझ्यात हरवून , हरपून जाईन

आणि तू वेडा तुझं लक्षच नसतं

कधी सारखा त्या चंद्रिकेकडे टक लावून असतोस.

उसळतोस तिच्यासाठी तुझ्यासाठी पाणी आणते मी

पण तुला भरती येते तिच्यासाठी मी नाही जा !

बोलणारच नाही आता येणारही नाही.

काठावरच्या लोकांना सांगून मोट्ठं धरण बांधीन

थांबून राहीन तिथेच.बघच मग.

सरिताच ती बोलल्याप्रमाणे वागली.

सागर बिचारा तडफ़डला आकसला,

आतल्या आत झुरत गेला.

शेवटी फ़ुट्ला बांध त्याच्याही संयमाचा

उठला ताड ओरडला

दहाड उफ़ाळला वारा पिऊन,

लाटांचं तांड्व घेऊन सुटला सुसाट

सरितेच्या दिशेने

लोक येडे.म्हणाले

'सुनामी आली ! सुनामी

कवी : अद्न्यात

AddThis Social Bookmark Button


" गारवा "  

Jul 13, 2009

त्याला पाऊस आवडत नाही,तिला पाऊस आवडतो.
ढग दाटून आल्यावर तो तिच्या तावडीत सापडतो.
मी तुला आवडते पण पाऊस आवडत नाही,
असलं तुझ गणित खरच मला कळत नाही.
पाऊस म्हणजे चिखल सारा पाऊस म्हणजे मरगळ,
पाऊस म्हणजे गार वारा पाउस म्हणजे हिरवळ.
पाऊस कपडे खराब करतो पाऊस वैतागवाडी
पाऊस म्हणजे गार वारा पाऊस म्हणजे झाडी.
पाऊस रेंगाळलेली कामे पाऊस म्हणजे सूटी उगाच,
पावसामध्ये गुपचुप निसटुन मन जाऊन बसतं ढगात.
दरवर्षी पाऊस येतो दरवर्षी अस होतं

दरवर्षी पाऊस येतो दरवर्षी अस होतं.
पावसावरून भांडण होऊन लोकांमध्ये हसं होतं
पाऊस आवडत नसला तरी ती त्याला आवडते
पाऊस आवडत नसला तरी ती त्याला आवडते.
पावसासकट आवडावी ती म्हणूण ती ही झगडते.
रूसून मग ती निघून जाते भिजत राहते पावसात.
रूसून मग ती निघून जाते भिजत राहते पावसात.
त्याचं तिचं भांडण असं ओल्याचिंब दिवसात. !!!!!!!!!!!

कवी : सौमित्र (अल्बम: गारवा)

AddThis Social Bookmark Button


माझ ब्लॉगविश्व

 

Design by Amanda @ Blogger Buster