Jan 22, 2010
खरच आई .......
प्रत्येक सातव्या जन्मी
प्रत्येक पुढचा जन्म
तुझ बोट धरून मी
ह्या जन्मात तुझ्या डोळ्यात
देता असता आला तर
खरच आई .......
मी रेश्मा....आपल्या पुण्यामधलीच... एक पुणेकर....... आपल्या साठी काही माझ्या काही कविता घेऊन आले आहे काही नव्या आणि भाउक शब्दात....मनातल्या भावना जमेल तश्या तोडक्या मोडक्या पण माझ्या शब्दात मांडण्यासाठी.. छोट्या छोट्या कल्पनातही आनंद शोधणे यात मोठी गंमत असते..आणि त्याच कल्पनांचा आणि अनुभवांचा आस्वाद आपल्या आपल्या समोर थोडक्यात पुढे मांडण्याचा माझा हा छोटासा प्रयत्न .. आणि काही संग्राहिक कविता ही .....अर्थात त्या चारोळीकर अथवा कवीच्या नावावरच .......
by मी रेश्मा | 0 comments
Links to this postआज म्हटल आयुष्य विणायला घेउया
जमतय का ते बघुया
वाटल अगदी सोप असेल
रंगसंगती जमून आली की आयुष्यही सुंदर दिसेल
प्रश्न पडला धागे कोणकोणते घ्यायचे
एक दोनच की सगळेच वापरायचे
मग ठरवल फक्त छान छानच धागे घेऊ
एक काय दोन काय सगळेच एकमेकांत विणु
सुरुवात केली वात्स्ल्याच्या धाग्याने
धागा होता फार उबदार आणि मुलायम
म्हटल छान आहे हा धागा
धाग्याने ह्या विण राहील कायम
मग घेतला मैत्रीचा धागा
म्हणता म्हणता ब-याच भरल्या जगा
थोड थोड आयुष्य आकार घेऊ लागलेल
पण अजुनही बरचस विणायच बाकी रहिलेल
एक एक धागा आशेचा, सुखाचा
आणि आनंदाचा घेतला
प्रत्येक धाग्यात तो आपसुकच गुंफत गेला
हळू हळू विण घट्ट होत होती
तरीदेखील कसली तरी कमी मात्र होती
मग घेतला एक नाजुक प्रेमाचा धागा
धागा होता सुंदर आणि रेशमी
धाग्याने त्या आयुष्याला अर्थ आला लागुनी
एक एक घेतला धागा यशाचा, कीर्तीचा
आणि अस्तित्वाचा आयुष्याला
त्यामुळे एक नवा उद्देश्य मिळाला
सगळेच धागे छान, सुंदर आणि प्रसन्न होते
तरीदेखील त्यांच्यातल्या एकसारखीपणाने
मन मात्र खिन्न होते
थोड़े धागे पडले होते
निवांत बसून असेच
म्हटल बघुया तरी ह्यांच्यामुळे
आयुष्य होतय का सुरेख
मग घेतला एक धागा दुक्खाचा एक निराशेचा
एक धागा अपयशाचा आणि एक धागा पराजयाचाहे
चारही धागे विणता एकमेकांमधे
आयुष्याला खरा अर्थ लाभला त्यांच्यामुळे
अपयशाशिवाय यश नाही
दुक्खाशिवाय सुख नाही
पराजयाशिवाय जय नाही
आणि निराशेशिवाय आशा नाही
महत्व पटल आहे सर्व धाग्यांच आज मला
सुंदर सुंदर धाग्यांनिच फक्त मजा नसते आयुष्याला
साध्या सुध्या लोकरीच्या विणकामातही
रंगसंगती ही लागतेच
मग आयुष्य विणतानाच
आपल्याला भीती का वाटते?
सर्व धागे एकमेकांत विणुनच
एक परिपूर्ण आयुष्य बनत
कुठला धागा कुठे, कसा वापरायचा
हे मात्र ज्याच त्याच्यावर असत..........
कवी : अज्ञात
by मी रेश्मा | 2 comments
Links to this postकशाला गं आईनं असं मला माललं..
ललून ललून नाक माझं लाल लाल झालं..
खलं खलं शांग आजी माझं काय चुकलं???
अंगणामध्ये गेले होते बिश्किट खात खात..
टॉमी तिथे बसला होता त्याचा खाऊ खात..
माझ्यातलं थोलं बिश्किट मी त्याला शुद्धा दिलं..
त्याच्या भांड्यातलं थोलं मी ही खाल्लं..
सगल्यांना देऊन खायचं असं आईनीश शांगितलं..
खलं खलं शांग आजी माझं काय चुकलं??
बाबांचा पांधला पांधला रूमाल मला
मिलालात्याच्यावर केचपचा मी लाल सूर्य काढला..
त्यावर मग मी थोडंसं दूध सुद्धा ओतलं..
सांग आता यात माझं असं काय चुकलं..??
रूमाल सगळा लाल लाल ,होता घाण झाला.
.दूध ओतून त्याला मी गोला गोला केला..
कलतंच नाही मला नेमकं काय झालं.
खलं खलं सांग आजी माझं काय चुकलं??
कवी : अज्ञात
by मी रेश्मा | 2 comments
Links to this postby मी रेश्मा | 1 comments
Links to this postby मी रेश्मा | 0 comments
Links to this postउंदिरमामा उंदिरमामा......नको तिकडे जाऊ
बाप्पा तुला मारेल त्याचा मोदक नको खाऊ
मोठे मोठे पोट त्याचे सुपासारखे कान
हाता एवढे लांब नाक तरी दिसते छान
पोटाला गुदगुदी त्याच्या नको करत राहू
बाप्पा तुला मारेल त्याचा मोदक नको खाऊ
पिवळे पिवळे धोतर त्याच्या पोटावर नाग
मांडीवर चढू नकोस त्याला येईल राग
पायावर उडया सारख्या मारत नको जाऊ
बाप्पा तुला मारेल त्याचा मोदक नको खाऊ
डोक्यावर मुकुट त्यात आहे बघ हीरा
बाप्पा तुला ओरडेल अरे जपून रहा जरा
पाठीमागे त्याच्या नको फिरत राहू
बाप्पा तुला मारेल त्याचा मोदक नको खाऊ
उंदिरमामा उंदिरमामा......नको तिकडे जाऊ
बाप्पा तुला मारेल त्याचा मोदक नको खाऊ
...........अमरीश अ. भिलारे
by मी रेश्मा | 0 comments
Links to this postby मी रेश्मा | 0 comments
Links to this postऐकतोस का रे माझं
ए पोट ढोल्या बाप्पा
तुला आहे का वेळ
जरा मारतोस का गप्पा
काय बाबा तुझी
भलतीच आहे मजा
देवून मोदक तुला
सारे करत आहेत पूजा
ताईच्या लाडवावर
ताव मारत बसशील
तिची डिमांड पूर्ण
करायचा विचार करत असशील
अरे माझ्याकडे बघ
जरा मला किती त्रास होतो
रोज होमवर्क करायचा
खूप कंटाळा येतो
काहीतरी कर असं की
नको होमवर्क, मजा मस्त
भाव नको खावूस असा
२ मोदक घेना जास्त
बघ जमलं तर ५ दिवसांत
दाखव चमत्कार तुझा
केलास होमवर्क बंद
तर शेवटच्या दिवशी तुला चीझ पिझ्झा ......
अमरीश अ. भिलारे.
by मी रेश्मा | 0 comments
Links to this postby मी रेश्मा | 0 comments
Links to this postby मी रेश्मा | 0 comments
Links to this post
गाईचे वासरावरती असते ते प्रेम………
चिमणीचे पिल्लांवरती असते ते प्रेम………
आईचे मुलांवर असते ते प्रेम………
नवरा- बायकोचे एकमेकांवर असते ते प्रेम………
अन् प्रियकराचे प्रेयसीवर व प्रेयसीचे प्रियकरावर असते ते सुद्धा प्रेमच……..
प्रेमाचे प्रकार तसे अनेकच,
पण त्याच्या मागील भावना मात्र एकच…..
आजच्या जीवनात खरे प्रेम तसे क्वचितच मिळते…
खरे प्रेम असावे तरी कसे!!!!!
तर….
खरे प्रेम असावे…..
कमळासारखे, जे पाण्याची साथ कधीच सोडत नाही,
त्याच्याशिवाय ते कधीच उगवत नाही….
खरे प्रेम असावे…..
गुलाबासारखे, जे कोमल आणि सुगंधी जरी असले,
तरी काटयाची साथ कधीच सोडत नाही….
खरे प्रेम असावे…..
आकाशासारखे विशाल व विस्तीर्ण..
कुठेही गेले तरी न संपणारे,
सदैव आपल्या बरोबर असणारे…..
खरे प्रेम असावे…..
पैशाने विकत न घेता येण्यासारखे,
वेळ आलीच तर पैशालाही झुकवण्यासारखे……
कारण…..
प्रेम हा काही खेळ नाही,
टाइम-पास करण्याचा तो वेळ नाही……..
by मी रेश्मा | 0 comments
Links to this postएकदा काय झालं,एक सरिता रागवली
आपल्या boyfriend ला म्हणाली'
हे रे काय सागर !मीच का म्हणून ?
दर वेळी मीच कामीच का यायचं खाली डोंगरावरून ?
आणायचं रानावनातलं सारं तुझ्यासाठी
दरी बघायची नाहीकडा बघायचा नाही
कशी सुसाट पळत येते मी विरहव्याकुळ, संगमोत्सुक
कधी एकदा तुला गच्च मिठी मारीन
तुझ्यात हरवून , हरपून जाईन
आणि तू वेडा तुझं लक्षच नसतं
कधी सारखा त्या चंद्रिकेकडे टक लावून असतोस.
उसळतोस तिच्यासाठी तुझ्यासाठी पाणी आणते मी
पण तुला भरती येते तिच्यासाठी मी नाही जा !
बोलणारच नाही आता येणारही नाही.
काठावरच्या लोकांना सांगून मोट्ठं धरण बांधीन
थांबून राहीन तिथेच.बघच मग.
सरिताच ती बोलल्याप्रमाणे वागली.
सागर बिचारा तडफ़डला आकसला,
आतल्या आत झुरत गेला.
शेवटी फ़ुट्ला बांध त्याच्याही संयमाचा
उठला ताड ओरडला
दहाड उफ़ाळला वारा पिऊन,
लाटांचं तांड्व घेऊन सुटला सुसाट
सरितेच्या दिशेने
लोक येडे.म्हणाले
'सुनामी आली ! सुनामी
कवी : अद्न्यात
by मी रेश्मा | 2 comments
Links to this postत्याला पाऊस आवडत नाही,तिला पाऊस आवडतो.
ढग दाटून आल्यावर तो तिच्या तावडीत सापडतो.
मी तुला आवडते पण पाऊस आवडत नाही,
असलं तुझ गणित खरच मला कळत नाही.
पाऊस म्हणजे चिखल सारा पाऊस म्हणजे मरगळ,
पाऊस म्हणजे गार वारा पाउस म्हणजे हिरवळ.
पाऊस कपडे खराब करतो पाऊस वैतागवाडी
पाऊस म्हणजे गार वारा पाऊस म्हणजे झाडी.
पाऊस रेंगाळलेली कामे पाऊस म्हणजे सूटी उगाच,
पावसामध्ये गुपचुप निसटुन मन जाऊन बसतं ढगात.
दरवर्षी पाऊस येतो दरवर्षी अस होतं
दरवर्षी पाऊस येतो दरवर्षी अस होतं.
पावसावरून भांडण होऊन लोकांमध्ये हसं होतं
पाऊस आवडत नसला तरी ती त्याला आवडते
पाऊस आवडत नसला तरी ती त्याला आवडते.
पावसासकट आवडावी ती म्हणूण ती ही झगडते.
रूसून मग ती निघून जाते भिजत राहते पावसात.
रूसून मग ती निघून जाते भिजत राहते पावसात.
त्याचं तिचं भांडण असं ओल्याचिंब दिवसात. !!!!!!!!!!!
कवी : सौमित्र (अल्बम: गारवा)
by मी रेश्मा | 3 comments
Links to this postby मी रेश्मा | 2 comments
Links to this post
तुझ्याच आठवांमधुनी सखे
काही श्वास तरंगून गेले
घडा रिताच राहीला आयुष्याचा
अन प्राण कलंडून गेले
हात तुझे ते हातांमधले
एकांती स्मरुनीया गेले
रंग हळवे ते शपथांचे
भासात विरुनीया गेले
आधार वाटणारे तुझे ते डोळे
काल स्वप्नात दिसुनीया गेले
दडपलेले दुःख मनातील
शब्दात उतरुनिया गेले
कवी : अद्न्यात
by मी रेश्मा | 4 comments
Links to this post